Posts

।। शिवछत्रपती ।।

Image
 आज साडेतीनशे वर्षांनंतरही इतिहासाची पाने पुन्हा पालटून पाहिली तर, अखंड भारतभूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेलेले वाचायला आणि ऐकायला मिळतात. त्यापैकी नामोल्लेख करण्यासारखे काही मोजकेच. परंतु छत्रपती म्हणून गौरवलेले एकुलते एकच होते. जे होते एकमेक "शिवछत्रपती." ज्यांचा आदर्श इतक्या वर्षांनंतरही कमी न होता त्यामध्ये आणखीन भरच पडत गेलीय. त्याचीच प्रेरणा म्हणून छत्रपतींची ही रयतपिढी तशीच पुढे मार्गक्रमण करत आलीय. शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊपोटी जन्मलेल्या शिवबाची कहाणीही तुम्हांआम्हांसारखीच. पण त्यांनी पाहिलेलं स्वप्ने मात्र अद्वितीय होती. दैवत मानलेल्या आई तुळजाभवानीच्या समोर मोजक्या सवंगड्यासोबत हाच शिवबा जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो तेव्हा त्याच्या रक्तात त्या स्वप्नांतील आग पेट घेत होती. आणि तिथूनच सुरू झाला "जय भवानी जय शिवाजी" चा प्रवास, जो त्या धगधगत्या रक्ताला योग्य दिशा देण्याचे काम करत होता. पण, इतक्या लहान वयात इतके मोठे स्वप्न पाहण्याचं नेमके कारण काय असावे, हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमके काय, काय होते शिवबाच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचे स्वरूप, आणि तो

Once upon a time in बुधवार पेठ,

Image
 सुरुवातीपासूनच सुरू करतो. साधी सरळ गोष्ट आहे, स्टार्ट to एंड. हा किस्सा अश्या दोन मित्रांचा आहे, ज्यांनी त्यांच्या ऐन जवानीच्या वयात अजूनही "बुधवार पेठ" पाहिलेली नसते.  पुण्यातील बुधवार पेठ.  श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन अनिल आणि सुनिल दोघेही बुधवार पेठच्या शोधात व्यस्त होतात. मी मुद्दामहुंन ही दोन नांवे निवडली आहेत, जेणेकरून कहाणीला थोडा आपलेपणा येईल आणि त्यामध्ये लिहताना वाचताना थोडी सत्यात जाणवेल अन्यथा त्यातील कोणत्याही पात्र, क्षण किंवा घटनेचा वास्तव्य किंवा माझ्या वैयक्तिक नावाशी, चरित्राशी वगैरे संबंध जोडण्याचा चावट आगावपणा कोणी करू नका. Okay, अनिल आणि सुनिल यांनी बुधवार पेठ केव्हाच पाहिलेली नसते. पण त्यांना गावातील, कॉलेजमधील त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की, दगडूशेठ गणपती मंदिर जवळच पेठेची गल्ली आहे. म्हणूनच श्री गणेशा करून भर उन्हात ते दोघे खांद्यावर कपड्याची बॅग घेऊन मंदिराच्या आवारात घिरट्या घालण्यास सुरूवात करतात. बुधवार पेठ म्हंटल की लोकांच्या आवाजाचे volume आपोआपच कमी होते, कारण, बुधवार पेठ म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील वेश्या व्यवसायासाठी प्र

अर्धवट राहिलेला लक्ष्या.. .

Image
  खरंतर नव्वदीच्या आधीपासून सर्वांची टीव्ही पाहण्याची सुरुवात ही लक्ष्या आणि अशोक मामा पासूनच होते, आज अशोकमामा ना पाहिलं की लक्ष्याची आठवण झाली नाही असं होणार नाही, आज जर लक्ष्मीकांत असते तर त्यांचाही चेहरा अशोक मामा सारखा फुगीर झाला असता, त्यांच्याही चेहऱ्यावर बारीक दिसणारे सुरकुते दिसले असते, त्यांचेही डोळे वयोमानाने खंगले असते, जसे अशोक मामाचे केस पिकलेत, तसेच लक्ष्मीकांत यांचेही केस पिकले असते, खरंतर त्यांना कोणी लक्ष्मीकांत म्हणतच नसत, कारण, त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये ते नेहमी ''लक्ष्या" च असायचे, जो मरताक्षणीच सर्वांचा लाडका "लक्ष्मीकांत बेर्डे" होऊन गेला, लहानपणी बाटलीतला गंगाराम पाहिला होता, लाल रंग पाहून अंगातली पावर गायब होऊन गुंडांचा मार खाणारा लक्ष्या पाहिला होता, तात्या विंचू जेव्हा लक्ष्याच्या छाताडावर बसून 'ओम क्लिंम क्लिंम ओम भट्ट स्वाहा.. ' म्हणतो तेव्हा घामेघुम सैरावैरा झालेला लक्ष्यासुध्दा एक बोलका बाहुलाच वाटायचा, आज जर लक्ष्मीकांत असते तर कदाचित झपाटलेलाचे सुध्दा गोलमाल हॅरी पॉटर सारखे पार्टवर पार्ट निघाले असते, धडाकेबाज गंगाराम

मूर्ख कोण? मी तू तू मी तू तू मी की, राशीबेन.. .!!

Image
विश्लेषण प्रपंच, आज मला मुद्दामहुन स्पष्टीकरण द्यावे लागत आहे की, मी किती मूर्खपणा केलाय आणि माझा देश कसा मूर्ख बनून गेला आहे याविषयी. मला जे वाटत आहे तेच तुम्हालाही वाटत असेल, किंवा तुमच्या मनात जे चालू आहे तेच माझ्याही मनात चालू असेल असं गृहीत धरूनच मी पुढे सुरुवात करतो; होय, मी एक मूर्ख नागरिक आहे. त्यामुळेच माझा देशही तितकाच मूर्ख देश बनतो. कारण, सर्वकाही माहीत असूनही मी मुद्दामहुन काही नियम मोडले तोडले. काहीही गरज नसताना रिस्क घेण्याची हौस म्हणून मी रस्त्यावर गल्लीमध्ये हिंडत राहीलो. फुकटच्या राशनसाठी मी सर्व नियम धाब्यावर मारले. 500 रुपयांसाठी मी बँकेत पहिल्याच दिवशी गर्दी केली. काल परवाच काही मित्रांसोबत एक पावसाळी ट्रिपसुध्दा मारून आलोय. मास्क म्हणजे माझ्यासाठी एक फॅशन बनून गेलीय. "कोरोना" किंवा नोवेल कोरोना किंवा कोविड19 असंही म्हणतात याला. हा एक रोग आहे. पूर्ण जगात याची महामारी घोषित झालीये. या इवल्याश्या न दिसणाऱ्या रोगाने आपली किती मोठी दहशत निर्माण केलीय याची जाहीर पूर्वकल्पना असूनही मी त्याला एकदम हलक्यात घेतलंय! ज्यामुळे तब्बल चाळीस लाखांचा मैल पार करून

सपनों का IdiotBox//0.4

"ATM चोर" दिवसभर न जेवलेने अथवा वेळेवर न जेवलेने कदाचित मला ऍसिडिटी झाली असावी. कारण, शरीरातील पित्त समुद्रमंथन व्हावे तसे वर खाली होत होते. सोबत मलाही वर खाली करण्यास भाग पाडत होते. चारी बाजूंनी आभाळ एकदम गच्च व्हावे, तसेच एकंदरीत डोक्याची अवस्था बनली होती. काही क्षण वाटायचे की, घालावा डोक्यात हात आणि जो काही extra गच्च करणारे मटेरियल आहे, त्याला बाहेर काढून फेकून दयावं. मग डोकं निवांत होऊन जाईल व शांतपणे झोपता येईल. नेमकं कोणत्या विशिष्ट कारणांनी माझं डोकं दुखत असेल, अश्या विविध कारणांवर मी शोधविचार करीत होतो. त्या विचारांमध्येच अर्धवट पहायचा राहिलेला 'पिकू' सिनेमा मी पहायला घेतला. पण, जसजसा दीपिका आणि इरफान (irrfan) चा लव्ह angle सिनेमाच्या एन्डकडे जात होता. तसतसा माझ्या शरीरातील पित्ताचे मंथन पिकूमधील बच्चनच्या लुज मोशन सारखे तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. न राहवून मी मोबाईल तसाच बाजूला टाकून दिला व दोन्हीं हातांनी जोरजोराने डोके चेपू दाबू लागलो. मध्येच बॅटरी कमी असा वॉर्निंग सिग्नल मोबाईलने दिला. लागलीच एका हाताने कसाबसा मोबाईल चार्जला लावून दिल

सपनों का IdiotBox//0.3

मेस्ट्रो (चोरी नाही अपहरण) शेजारच्या घरातून ऐकायला येणारी कुजबुज नेहमीच माझी झोपमोड करणारी ठरायची. कधी दिवसां कधी मध्यरात्री. एक शब्द न शब्द त्यांच्या संवादातील माझ्या कानावर पडायचे. Actually तो संवाद नसायचाच. ती एक कुजबुज असायची स्पष्ट ऐकू न येणारी पण झोपमोड करून जाणारी. असं वाटायचं जणू काही त्यांच्यामध्ये एखादी दहशतवादी मिटिंग चालू असावी. आणि त्यांचं नेक्स्ट टार्गेट मीच आहे. जेव्हा त्यांना समजेल की, त्याच्या मिटींग मधील एक शब्द न शब्द मी ऐकत असतो. त्या क्षणीच ते माझ्यावर सहकुटुंब हल्लाबोल करणारे होते. असो, डिग्रीचे दिवस सुरू होते. दुसऱ्याच दिवशी माझ्या एका न सुटणाऱ्या अवघड विषयाची फायनल exam होती. अन् मी त्या दहशतवादी कुटूंबाची कुजबुज ऐकत अभ्यासाचे नियोजन करीत होतो. वेळापत्रक पाहताक्षणी माहीत झाले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थंडीमध्ये कुडकुडत परीक्षेला जावे लागणार. पण मला थंडीपेक्षा त्या गोल्डन विषयाचं जास्ती टेन्शन होतं. कारण, जर यावेळीही मी त्या विषयात नापास झालो, तर माझं पूर्ण वर्ष पुन्हा एकदा बेकार जाण्याच्या मार्गावर होते. माझ्यासोबत माझा मित्र "प्रा" सुद

"ताजे चिरमुरे"

Image
खुप दिवसांपासून मनात कोणता विषयच तयार होत नव्हता. काय लिहावे, कोणत्या विषयावर लिहावे, कसे लिहावे, लिहिलेलं इतरांना आवडेल का.?! असे खूप प्रश्न शोधत असताना अचानक एक रिक्षा दिसली, जी बाजूच्या गल्लीतून आवाज करत निघत होती. लक्षात ठेवा बाग. नारळाची बाग.. . सगळ्यांना सांगा बाग. नारळाची बाग.. . विसरू नका नारळाची बाग.. . पहिल्यांदा ऐकुन खूप गमतीशीर वाटलं. पण नंतर समजले की, काही दिवसांनी येणाऱ्या निवडणुकीसाठीचा हा प्रचार चालू आहे. काही वेळाने ती रिक्षा गल्लीचे चार पाच फेऱ्या मारून निघून गेली. पण मनातील प्रश्न अजूनही त्याच जागी होते. त्यांना कोणता विषयच सापडत नव्हता. वेळ निघून जात होती. दुपारचेअंदाजे बारा एक वाजणार होते. पोटाची भूकही हळूहळू वाढत होती. पण डोळ्यांना नकळत थोडीशी डुलकी लागणार इतक्यात नेहमीच्या वेळी ऐकू येणारे ते शब्द हळुवार कानावर येऊन पडत होते, "ताजे चिरमुरे.. . ताजे चिरमुरे.. .'' लहान असल्यापासून चिरमुरे विषयी एक वेगळंच आकर्षण असायचं. तात्पुरती भूक म्हणून चहासोबत आम्ही नेहमी चिरमुरे खायचो. मंदिराच्या ठिकाणी सुद्धा प्रसाद म्हणून सर्रासपणे चिरमुरेच वाटले जातात.

ओय हमाली.!!

Image
Exactly, बरोबर ऐकलंय तुम्ही. पण कुठे ऐकलं असेल.?? रेल्वे स्टेशन. बस स्टँड. विमानतळ मध्ये हमाली असतो की नाही याची मलाही कल्पना नाहीय. पण असेलही कदाचित. तोच हमाली जो आपण लोकांनी लहानपणी पाहिला असेल. बच्चनच्या कूली मध्ये किंवा लक्ष्याच्या हमाल दे धमाल मध्ये. खाकी पेहरावात रुबाबदार मिश्या आणि त्यावर इस्त्री मारलेली तशीच खाकी टोपी. सोबत खांद्यावर ती लाल बावट्याची निशाणी म्हणून टाकलेला लाल रुमाल. रेल्वे आली रे आली पटकन मळलेली तंबाखू तोंडात टाकायची आणि तडक प्रवाश्यांच्या बॅगा डोक्यावर घ्यायच्या. पुढे हमाली आणि मागे त्या बॅगेचा मालक हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. किमान गोविंदाच्या कूली नं.1 मध्ये तरी पाहिला असेलच. पण, त्या रात्री जेव्हा मी आणि माझा मित्र एका बस स्टँडवर गेलो होतो, तेव्हा त्या बस स्टँडवर एका वयस्क माणसाने आम्हाला हाक दिली. "ओय हमाली.!!""" नाही.... अशी हाक नव्हती मारली त्याने. पण त्याचा त्या हाकेमागचा उद्देश तोच असावा. "अरे पोरांनो... मला थोडी माझी सायकल बसवरून काढून देता का रे.?!" अतिशय क्षीण आवाजात त्याने आम्हाला विनंती केली. प